shalaka
History
- Member for
- 2 years 46 weeks
|
|
SearchUser loginNavigationखाण्याबद्दल पु. लं.चे शब्द ...सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली अाहे; नव्हे टिकली अाहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी − तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा. दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. संक्रांतीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत अाणि तिळगूळ अाहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोकं. कोजागिरी पौर्णिमेतून अाटीव केशरी दूध वगळा, उरेल फक्त जागरण अाणि कुठल्यातरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. गणेशचतुर्थीला मोदक नसले तर अारत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या? रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन खडीसाखर ... सा-या देवांची मदार ह्या खाण्यावर अाहे. Who's onlineThere are currently 0 users and 2 guests online.
|
Recent comments
1 year 47 weeks ago
1 year 49 weeks ago